मुंबई : राज्यपालांविरोधात पवईमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
पवई(मुंबई), पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहे. पवई सर्कल येथे रविवार (दि २०) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हातात न फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी कोशारी यांना केंद्र सरकार ने परत बोलावून घ्यावे आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. वारंवार राज्यपाल हे वादग्रस्त विधाने करीत आहेत आणि राज्यात अशांतता निर्माण करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या हिरानंदानी विभागात झालेल्या या निषेध आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा