Devendra Fadnavis : राज्यपालांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढून राजकारण : देवेंद्र फडणवीस
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. याबाबत भाजपने माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली. पुणे येथील 71वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेच्या समारोप कार्यक्रदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. सूर्य, चंद्र आणि तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असतील. राज्यपालांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढून राजकारण केले जात आहे. सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य मी व्यवस्थित ऐकले आहे. त्यांनी चुकीचेविधान केलेले नाही. छत्रपती शिवाजी माहाराज यांच्याच विचारांवर आमची वाटचाल सुरु आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis )
हेही वाचा