बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा | पुढारी

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या असून अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत असे सांगत त्यांनी मनोबल वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत.

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असे पवार यांनी सांगितले.

 

Back to top button