रत्नागिरी: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प | पुढारी

रत्नागिरी: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

राजापूर;पुढारी वृत्तसेवा: अणुस्कुरा घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरुच असुन रविवारी पहाटे पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटवायला सुरुवात केली आहे. सकाळपर्यंत या घाटातून एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. दुपारपर्यंत वाहतूक सुरू होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

चार दिवसांपुर्वी अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घाटात दरड कोसळुन मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मशिनरीच्या सहाय्याने दरड हटवली असुन एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. दुपारपर्यंत संपूर्ण घाट मोकळा होईल अशी माहिती संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button