15 हजार कोटी एफआरपी जमा; 596 लाख 72 हजार मे. टन ऊस गाळप
पुणे: पुढारी वृत्तसेवा
जानेवारी महिनाअखेर साखर कारखान्यांकडून सुमारे 596 लाख 72 हजार मे. टनाएवढे ऊस गाळप झाले. त्यापोटी शेतकर्यांच्या बँक खात्यावर तब्बल 15 हजार 710 कोटी 88 लाख रुपयांइतकी (91.11 टक्के) एफआरपीची रक्कम जमा करण्यात आली. सद्य:स्थितीत 1 हजार 532 कोटी 26 लाख रुपयांइतकी (8.89 टक्के) एफआरपीची रक्कम देणे बाकी असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.
चालू वर्ष 2021-22 या हंगामात 30 जानेवारीअखेर सुुरू असलेल्या 191 पैकी 83 साखर कारखान्यांनी शेतकर्यांच्या बँक खात्यावर उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची शंभर टक्के व त्यापेक्षा जास्त जमा केलेली आहे. तर साठ टक्क्यांच्या आत म्हणजेच कमी रक्कम देणारे 28 साखर कारखाने असून, ताज्या एफआरपी अहवालात अशा कारखान्यांना साखर आयुक्तालयाने रेड झोनमध्ये टाकले आहे.
२०१४ च्या तुलनेत संस्थागत रोजगारात २२ टक्क्यांनी वाढ : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या माहितीसाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी परिपत्रक जारी केले आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना पारदर्शक पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी देण्याची आर्थिक सक्षमता समजावी, या हेतूने चालू हंगामातील जानेवारी 2022 अखेरची एफआरपीची सद्य:स्थिती नमूद केली आहे. साखर आयुक्तांनी याबाबत केलेल्या परिशिष्टात कराराप्रमाणे शंभर टक्के एफआरपीची रक्कम देणारे कारखाने हिरव्या रंगाने (83 कारखाने), कराराप्रमाणे 80 टक्के ते 99.99 टक्के रक्कम देणारे कारखाने पिवळ्या रंगाने (47 कारखाने), कराराप्रमाणे 60 ते 79.99 टक्के रक्कम देणारे कारखाने नारंगी रंगाने (33 कारखाने), तर कराराप्रमाणे 59.99 टक्क्यांपर्यंत एफआरपी रक्कम देणारे कारखाने लाल रंगाने (28 कारखाने) दर्शविले आहेत.
Indrani Mukherjee : इंद्रानी मुखर्जीची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव
कोल्हापूर, सांगलीतील कारखाने आघाडीवर
एफआरपीची रक्कम देण्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखाने आघाडीवर आहेत. त्या खालोखाल सातारा, अहमदनगर, लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. एफआरपीची शंभर टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम देणार्या कारखान्यांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे: कोल्हापूर 16, सांगली 11, सातारा 8, पुणे 6, अहमदनगर 8, उस्मानाबाद 2, सोलापूर 6, लातूर 8, नांदेड 1, हिंगोली 2, परभणी 2, जालना 2, औरंगाबाद 3, नाशिक 2, नंदुरबार 2, जळगाव 1, भंडारा 1, वर्धा 1, यवतमाळ 1
हेही वाचा :
बिबट्याच्या कातडी तस्करीचा नाशिकच केंद्रबिंदू ; शहापूर वनविभागाचा संशय
मुंबई : एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला आग, मशीन जळून खाक
पुणे : जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान