Shashi Tharoor On Indian Team : भारताच्या पराभवानंतर शशी थरूर भावुक; म्हणाले, 'मला भारताच्या पराभवाने'
पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारतावर १० गडी राखून सहजरित्या विजय मिळवला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे भारतीय चाहत्यांसह काँग्रेस नेते शशी थरूरही निराश झाले आहेत. भारताच्या पराभवानंतर शशी थरूर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Shashi Tharoor On Indian Team)
शशी थरूर म्हणाले, “भारतीय संघाचा पराभव झाला याबाबत मला काहीच हरकत नाही. जिंकणे, पराभव होणे, हा खेळाचा भाग आहे. मात्र, आजच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या नावलौकीकास साजेशी कामगिरी करू शकला नाही. भारतीय संघ आज भारतीय संघाप्रमाणे खेळू शकला नाही.” काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारताचा पराभव होण्यापूर्वीच हे ट्वीट केले होते. इंग्लंडने भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी (दि.१३) इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान असा टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. (Shashi Tharoor On Indian Team)
इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना १६८ धावा केल्या. फायनलमध्ये धडक मारण्यासाठी इंग्लंडला १६९ धावांची गरज होती. भारताचे १६९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने १० विकेट्स आणि ४ षटक राखून पार केले. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने हा विजय संपादन केला. (Shashi Tharoor On Indian Team)
I don’t mind India losing: victory & defeat are part of sports. But I do mind India not showing up today. #T20WorldCup
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 10, 2022
A massive loss saw India make an exit from the #T20WorldCup 👀
More from the coach ⬇#INDvENGhttps://t.co/h3RHaNRXz8
— ICC (@ICC) November 10, 2022
हेही वाचलंत का?
- Virat Kohli T20 4000 Runs : किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम, बनला 4 हजारी मनसबदार!
- INDvsENG T20WC : इंग्लंडची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव
- IND vs ENG Semi Final : टीम इंडियाचे ‘हे’ ५ खेळाडू ठरतील मॅच विनर! त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर संघ पोहोचेल फायनलमध्ये