नव्या सरकारचे स्वागत ‘तुंबई’त | पुढारी

नव्या सरकारचे स्वागत ‘तुंबई’त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  गुरुवारी सत्तारूढ झालेल्या नव्या सरकारचे स्वागत मुंबईत धुवाधार पावसाने केले. या पहिल्याच मुसळधार पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल हे नेहमीचे भाग पाण्याखाली गेले. परिणामी ठिकठिकाणी रस्ते वाहतूक तुंबली आणि धावणारी मुंबई तुंबलेल्या पाण्यातून रांगत सरकू लागली.

रेल्वे मार्गातही पाणी घुसल्याने रात्री मध्य आणि पश्‍चिम रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीसह दादर, कुर्ला, मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मरिन लाईन, दादर, वांद्रे, अंधेरी बोरिवली रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म व पादचारी पूल प्रवाशांनी भरले होते. लोकलच्या रांगा लागल्यामुळे तासाभराचा प्रवास दोन ते अडीच तासांवर पोहोचला.

Back to top button