12वी झालेल्यांसाठी एअर इंडियात नोकरीची सुवर्णसंधी | पुढारी

12वी झालेल्यांसाठी एअर इंडियात नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

एअर इंडियामध्ये 500 जागांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती नवी दिल्ली आणि मुंबई शहरात होणार आहे. विशेष म्हणजे यासाठीची शैक्षणिक पात्रता केवळ 12 पास अशी ठेवण्यात आली आहे. देशातील सरकारी मालकीच्या एअर इंडियात कॅबिन क्रू साठी जागा निघाल्या आहेत. एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट www.airindia.in ही जाहीरात प्रसिद्ध केली आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 12 मार्च 
पद- कॅबिन क्रू
पदांची संख्या- 500
शैक्षणित पात्रता- 12वी पास
निवडीची प्रक्रिया- अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड स्क्रीनिंग आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 
पगार- 15 हजार महिना 

Back to top button