बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुचंडी (ता. बेळगाव) येथे शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर गल्ली येथे गुरूवार दि. २ रोजी दुपारी विहिरीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. गौतम श्रीकांत कोणो (वय १०) असे त्याचे नाव आहे.
अधिक वाचा-
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यावेळी त्याला बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून गौतम बेपत्ता झाला होता. सायंकाळी ५ नंतर त्याच्या कुटुंबियांनी गावांमध्ये तसेच परिसरात शोध घेतला. पण, तो आढळून आला नाही.
अधिक वाचा-
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्याबाबत माहिती असल्यास, संपर्क साधावा असे त्याच्या कुटुंबियांनी आवाहन केले होते. मात्र गुरुवारी रात्री अकरा वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.
अधिक वाचा-
त्याच्या घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीमध्ये तो आढळून आला. खेळता खेळता गौतम हा विहिरीकडे गेला असावा. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आहे.
गौतम मुचंडी येथील मराठी शाळेत शिक्षण घेत होता. शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मुचंडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेदेखील वाचा-
पाहा व्हिडिओ – एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?