बेळगाव : भरधाव टिप्परने 54 बकर्यांना चिरडले
संकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : भरधाव टिप्परने चिरडल्याने 54 बकरी ठार झाल्याची घटना अम्मणगी-मुगळी रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.
हालप्पा हेगडे व लगमण्णा हेगडे यांच्या मालकीचा हा कळप होता. याबाबत अधिक माहिती अशी की, अम्मणगीहून मुगळी मार्गावर हेगडे यांचा कळप रस्त्याच्या कडेने जात होता. पाठीमागून भरधाव निघालेल्या टिप्परच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट कळपात शिरले. झालेल्या अपघातात 54 बकर्या ठार झाल्या.
अम्मणगी-मुगळी मार्गावरील उतारावर टिप्परचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.