कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत गेल्‍यास राज्‍यात पुन्‍हा लॉकडाउन करावा लागेल : उपमुख्‍यमंत्री अजित पवार | पुढारी

कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत गेल्‍यास राज्‍यात पुन्‍हा लॉकडाउन करावा लागेल : उपमुख्‍यमंत्री अजित पवार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी कोरोना रूणांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, निर्बंध लादून पुन्हा लॉकडाउन करावे लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. येथे राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नुतनीकरणाची पहाणी आणि उद्‌घाटन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. राज्‍यातही कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

काळजी घेणे गरजेचे : उपमुख्‍यमंत्री अजित पवार

अनेक राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आलेले आहे. आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो, त्यावेळी आपण एकमेकांच्या समोर येतो, त्यावेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button