Rishabh Pant Accident : ‘या’ पाच क्रिकेटपटूंनी जीवघेण्या अपघातातून सावरत मैदानावर केले पुनरागमन | पुढारी

Rishabh Pant Accident : ‘या’ पाच क्रिकेटपटूंनी जीवघेण्या अपघातातून सावरत मैदानावर केले पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाला बराच वेळ लागू शकतो. पंतच्या आधीही असे अनेक क्रिकेटपटू सोबत अपघात घडले आहे. अशा जीवघेण्या अपघातानंतर हे दिग्गज खेळाडू परतले आणि त्यांनी पुन्हा मैदान गाजवले. अशा स्थितीत आता पंतकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Rishabh Pant Accident)

स्फोटक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा रुरकी (उत्तराखंड) येथे ३० डिसेंबरच्या पहाटे अपघात झाला. या दुर्देवी घटनेत पंतला गंभीर दुखापत झाली असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंत दिल्लीहून घरी जात असताना त्यांची भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली. डिव्हायडरला धडकताच त्याच्या कारला आग लागली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी वेळीच त्याला कारमधून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. पंत शिवाय या आधी काही क्रिकेटपटूंचाही अपघात झाला आहे. चला तर जाणून घेऊया अशा पाच क्रिकेटर्स बाबत ज्यानी अपघातानंतर पुन्हा मैदानात पुनरागमन केले. (Rishabh Pant Accident)

गोलंदाज मोहम्मद शमी अपघातात झाला होता जखमी (Rishabh Pant Accident) 

सध्या टीम इंडियाचा सीनियर फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा २०१८ मध्ये अपघात झाला होता. शमी डेहराडूनहून दिल्लीला येत होता. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात शमीच्या उजव्या डोळ्याला टाके पडले होते. या अपघातानंतर शमीने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले होते.

श्रीलंकेच्या फिरकीपटूचा अपघाता वाचला होता जीव

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज कौशल लोकुराच्ची याने सुद्धा अपघातानंतर मैदानावर शानदार पुनरागमन केले होते. कौशलने एप्रिल २००३ मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केले आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा अपघात झाला होता. या अपघातात कौशलच्या खांद्याला दुखापत झाली होती. कौशलचा हा अपघात इतका भीषण होता की, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निलंबित केले होते. मात्र, त्यानंतर कौशलने पुनरागमन केले आणि २०१२ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (Rishabh Pant Accident)

मन्सूर अली खान पतौडी यांनी अपघातात गमावला डोळा

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनीही कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केले होते. वयाच्या 20 व्या वर्षी पतौडी यांचा कार अपघात झाला ज्यामध्ये त्यांना त्यांचा उजवा डोळा गमवावा लागला. पण, तरीही त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आणि इतिहास रचला.

अपघातानंतर पायात रॉड घातलेल्या साईराज बहुतुले यांनी मैदान गाजवले

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांचाही कार अपघात झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी साईराज बहुतुले हे मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ मित्रांसोबत कारमधून जात होते. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्याचा एक मित्र ठार झाला, तर साईराजच्या पायात रॉड टाकण्यात आला होता. या दुखापतीतून सावरायला साईराजला जवळपास एक वर्ष लागले पण त्यानंतर त्यांनी मैदानात परतले आणि भारतासाठीही क्रिकेट खेळला.

सुनील गावसकर यांचाही अपघात होता झाला

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याही कारचा २०१४ साली अपघात झाला होता. पण, तेव्हा ते क्रिकेटमधून निवृत्त झाले होते आणि प्रसिद्ध समालोजक म्हणून नवी ओळख निर्माण केली होती. लंडनमध्ये मँचेस्टरला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता. कार चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात घडला होता. या अपघात कोणीही जखमी झाले नव्हते.

अधिक वाचा :

Back to top button