Bhagat Singh Koshyari Tweet : राज्यपालांकडून 'त्या' वक्तव्यावर खुलासा; नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला...
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु आहे. गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही, असा दावा भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यावरुन वाद वाढल्यानंतर राज्यपालांनी ट्विट (Bhagat Singh Koshyari Tweet ) करत आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा ट्विटद्वारे केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 30, 2022
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
ऐका .. ऐका… pic.twitter.com/dOvC2B0CFu— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 30, 2022
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 30, 2022
- मुख्यमंत्रीसाहेब, आरक्षण देणार का?; मराठा कार्यकर्त्यांनी रक्तानं लिहिले निवेदन
- मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना…स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर राज्यपालांचा राजीनामा मागा : संजय राऊत