राजकीय उलथापालथ सुरू असतानाच ईडीची मुंबईत छापेमारी
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्ता बदलाच्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असतानाच सक्तवसुली संचालनालय (ईडी) ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीच्या पथकांनी बुधवारी सकाळपासून मुंबईत ६ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
ईडीच्या मुंबईतील छापेमारीमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ईडीने एका बँक घोटाळा प्रकरणात ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ईडीने नेमक्या कोणत्या बँक घोटाळाप्रकरणात ही छापेमारी केली आहे, याची अद्याप माहिती समोर आली नाही.