Lok Sabha Election 2024 | दुपारी १ पर्यंत ३९.९२ टक्के मतदान, प. बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात कमी | पुढारी

Lok Sabha Election 2024 | दुपारी १ पर्यंत ३९.९२ टक्के मतदान, प. बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात कमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत ३९.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ४९.२७ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे ३१.५५ टक्के मतदान झाले होते.

दुपारी १ पर्यंतची मतदानाची आकडेवारी

आसाम- ४५.८८ टक्के
बिहार-३६.६९ टक्के
छत्तीसगड- ४६.१४ टक्के
दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव- ३९.९४ टक्के
गोवा- ४९.०४ टक्के
गुजरात- ३७.८३ टक्के
कर्नाटक- ४१,५९ टक्के
मध्य प्रदेश- ४४.६७ टक्के
महाराष्ट्र- ३१.५५ टक्के
उत्तर प्रदेश- ३८.१२ टक्के
पश्चिम बंगाल- ४९.२७ टक्के

आज ७ मे रोजी देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील बारामती, रायगड, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. तर तिसऱ्याच टप्प्यात गुजरातमधील सर्व २६ मतदारसंघामध्येही निवडणूक होत आहे.

महाराष्ट्रात होत असलेल्या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता. दरम्यान, बारामतीमधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरलेली आणि देशातील लक्षवेधी लढतींपैकी एक आहे.

हे ही वाचा :

Back to top button