पीएम मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा; म्हणाले...
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय गोलंदाजाच्या भेदक मार्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा उडालेला धुव्वा आणि त्यांनतर कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज ८६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर आज (दि.१४) भारताने क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ७ गडी राखत विजय मिळवला. या दिमाखदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाने घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला वन-डे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे.
वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा सलग आठवा विजय ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धचे ‘अजिंक्य’पद टीम इंडियाने अबाधित ठेवले आहे. या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “अभिनंदन टीम इंडिया.. अहमदाबादमध्ये आज एक सर्वांगीण दृष्टीने उत्कृष्ट विजय मिळवला आहे. टीम इंडियाचे अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.”
Team India all the way!
A great win today in Ahmedabad, powered by all round excellence.
Congratulations to the team and best wishes for the matches ahead.
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2023