‘परिणीतीशी साखरपुडा झाल्याने चिडवणे बंद’ | पुढारी

'परिणीतीशी साखरपुडा झाल्याने चिडवणे बंद'

अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत हॉटेलबाहेर परिणीतीला स्पॉट करण्यात आले, त्यावेळेपासून ती चर्चेत आहे. सुरुवातीला परिणीतीने राघव यांच्यासोबत असलेले नाते स्वीकारले नव्हते. पण आता 13 मे रोजी राघव आणि परिणीती यांनी मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला. आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पण लग्नाबद्दल अद्याप दोघांपैकी कोणीही वक्तव्य केलेले नाही. पण परिणीतीबरोबर साखरपुडा केल्यानंतर राघव यांच्या आयुष्यात खूपच बदल झाला आहे. याबाबत स्वतः राघव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राघव म्हणाले, मला वाटते की, आपण काही गोष्टी राजकीय आघाड्यांपुरत्या मर्यादित ठेवल्या पाहिजे. माझे पक्षातील सहकारी आणि वरिष्ठ मला आता चिडवत नाहीत. पूर्वी ते मला कायम परीच्या नावाने खूप चिडवायचे. पूर्वी लोक माझ्यावर दबाव टाकायचे. नेहमी सांगायचे लवकर लग्न कर. माझा साखरपुडा झाल्यानंतर अनेकांचे बोलणे बंद झाले.

Back to top button