इंडिया आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या एकत्र येण्यात काहीही नवीन्य नाही. कारण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, गुजरात, हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपची मुख्य लढत फक्त काँग्रेसशी आहे. बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजपविरोधात काँग्रेसने आधीच स्थानिक पक्षांसमवेत हातमिळवणी करून आघाडी केली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, पंजाबमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करताना सुखासुखी तडजोड होणारी नाही.