महाराष्ट्रातील 4 धरणांनी वयाची 150 वर्षे ओलांडली | पुढारी

महाराष्ट्रातील 4 धरणांनी वयाची 150 वर्षे ओलांडली

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  अस्तित्वाच्या 100 वर्षांवर कालावधी ओलांडलेली देशात 234 धरणे असून, अशी सर्वाधिक 63 धरणे मध्य प्रदेशात आहेत. वयाची 150 ते 1300 वर्षे ओलांडलेली 14 धरणे देशात आहेत. यातील 4 धरणे महाराष्ट्रात आहेत. संसदेच्या स्थायी समितीने याबाबात सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर जलसंपदा मंत्रालयाने सुरक्षा लेखापरीक्षण सुरू केले आहे.

या सर्व धरणांच्या सुरक्षेबाबतचा संपूर्ण आढावा घेऊन 3 महिन्यांत अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कालबाह्य झालेली ही धरणे पाडून नद्यांचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. ती तयार करावी. कालबाह्य धरणांबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संसदीय समितीने व्यक्त केली आहे.

150 ते 1300 वर्षे जुनी 14 धरणे

राज्य                              धरण                   वय
कर्नाटक                      थोण्णूर टँक           1300
आंध्र प्रदेश                   कुंबूम टँक              523
राजस्थान                    स्वरूप सागर           463
राजस्थान                      उदयसागर            438
राजस्थान                       राजसमंद             347
राजस्थान                       जयसमंद              293
उत्तर प्रदेश                 बरुआ सागर            329
उत्तर प्रदेश                    मगरपूर                329
उत्तर प्रदेश                पचवाडा लेक            329
ओडिशा                     जगन्नाथ सागर          242
महाराष्ट्र                 धामापूर (सिंधुदुर्ग)         433
महाराष्ट्र               कळपविहीर (बुलडाणा)    223
महाराष्ट्र                  मुडाना (यवतमाळ)        223
महाराष्ट्र                 भुशी (लोणावळा, पुणे)     163

धरण दुर्घटना

  • 1917 ते 2007 दरम्यान देशात धरणफुटीच्या 5 मोठ्या घटना घडल्या आहेत.
  • 1979 मध्ये घडलेली गुजरातेतील मोरबीतील मच्छू धरण फुटल्याची घटना सर्वात भयावह होती.
  • 2000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू धरणफुटीच्या घटनांमध्ये झाला आहे. मालमत्तेची हानी वेगळी.
  • 1917 मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे तिघरा धरण बांधून पूर्ण झाले आणि त्याच वर्षी ते फुटले होते, हे येथे उल्लेखनीय!
  • 1961 मध्ये पानशेत धरण फुटल्याने अवघे पुणे जलमय झाले होते. लोकांनी पर्वती टेकडीवर आश्रय घेतला होता.
  • 1967 मध्ये महाराष्ट्रातील कोयना धरण क्षेत्रात 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. धरण सुरक्षित राहिले.
  • 2019 मध्ये महाराष्ट्रातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटले होते.

धरण सुरक्षा प्राधिकरणाला निधी केवळ 12 कोटी रुपये

वास्तविक केंद्र सरकारने 2 वर्षांपूर्वी धरण सुरक्षा कायदा पारित केला होता. राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणही स्थापन केले. निधी मात्र केवळ 12 कोटी रुपये देण्यात आला होता.

Back to top button