वर्ध्याचा पारा ४४ अंशांवर! | पुढारी

वर्ध्याचा पारा ४४ अंशांवर!

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या पहिल्याच आठवडयात तापमानात वाढ झाली आहे. रविवारी ५ मे रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंद झाले. मागील काही दिवसांपासून तापमानात हळूहळू वाढ होत आहे. शनिवारी वर्धा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी पाच मे रोजी जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिवाची लाहीलाही होऊ लागली आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओसाड दिसतात. रविवारी सुट्टीचा असतानाही शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. तापमान वाढत असल्याने प्रत्येकाने त्या अनुषंगाने काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळांना सुरूवात होते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा सुरू असतात. घराबाहेर निघताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

Back to top button