वाशिम : पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांला स्वाभिमानीकडून मारहाण
वाशीम, पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावल्या. दरम्यान शेतकऱ्यांना रिलायन्स पीकविमा कंपनी नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आली होती.
यानंतर विदर्भ अध्यक्ष दामू इंगोले यांनी रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद ला बोलावून पीकविमा संदर्भात जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे स्वाभिमानी चे विदर्भ प्रमुख दामू इंगोले आक्रमक होऊन संबंधित कंपनीच्या कर्मचार्यांना चांगलाच चोप दिला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर यापुढे पीक विमा कंपनीच ऑफिस फोडण्याचा इशारा दिला आहे.