कराड : ‘पुढारी’च्या रेस्क्यु बोटीने वाचवले १५ जणांचे प्राण
कराड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तारळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
तारळी पूल पाण्याखाली गेल्याने पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा मंदिरासह मंदिर परिसर व व्यापारी पेठेला पुराचा वेढा पडला होता.
अधिक वाचा :
- कराड : साजूर गावात मृतावस्थेत सापडला बिबट्या
- हेलिकॉप्टर येईना; ए, काढ रे गाड्या…! सातार्यातून सांगलीकडे अजितदादांची पूरग्रस्तांसाठी धाव
- पूरग्रस्तांना केंद्राकडून सर्वोतपरी मदत : आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
या पुरात अनेक नागरिक अडकले होते. कराड नगरपालिकेने ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन करून पंधरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले.
दै. ‘पुढारी’ रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अत्याधुनिक यांत्रिक बोट, दहा जीवनरक्षक जॅकेट, लहान मुलांसाठी पाच जीवनरक्षक जॅकेट, दहा बिओ रिंगसह अन्य साधने काही महिन्यांपूर्वी प्रदान केली होती.
अधिक वाचा :
- सांगली महापूर : पुराचा सांगलीत मुक्काम; जिल्ह्यात ओसरला
- काँग्रेस पक्षामुळेच संसदेचे कामकाज ठप्प : पंतप्रधान नरेंद्र माेदी
- उदगांव येथे सांगली कोल्हापूर- महामार्ग सुरू, १० वाजता दुचाकी सोडणार
यावेळी यांत्रिक बोटीसह जीवनरक्षक जॅकेट व बिओ रिंग आदी साहित्य कराड पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले होते.
या बोटीमुळे पाल येथील नागरिकांना पूरामधून यशस्विरित्या बाहेर काढण्यात आले. ‘पुढारी’ ने दिलेल्या रेस्कू बोटीमुळे नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आल्यामुळे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दै. ‘पुढारी’चे आभार मानले.