टाकळी येथील ओढ्यात बडून तीन मुलींचा मृत्यू; मिरज तालुक्यातील घटना | पुढारी

टाकळी येथील ओढ्यात बडून तीन मुलींचा मृत्यू; मिरज तालुक्यातील घटना

मिरज; पुढारी वृत्तसेवा : टाकळी (ता. मिरज) येथील ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या तीन पारधी कुटुंबातील मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ५) दुपारी ही घटना घडली.

टाकळी हद्दीतील जुना मालगाव रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यात नंदिनी देवा काळे (वय 16), मेघा काळे (वय 18) आणि स्वप्नाली पवार (वय 6 सर्व रा. आंबेडकर नगर, टाकळी) या तीन मुली शुक्रवारी दुपारी अंघोळीसाठी गेल्या होत्या.

यावेळी पाण्यात ओढ्याच्या पाण्यात खड्डा असल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ओढ्याच्या काठावर मुलींचे चप्पल आढळल्याने कुटुंबानी शोधाशोध केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबविली, यावेळी तिन्ही मुलींचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सदरचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र ऐन सणासुदीत पारधी कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

Back to top button