… तर मुख्यमंत्रीपदाची चिंता एकनाथ शिंदे यांनी करावी : जयंत पाटील | पुढारी

... तर मुख्यमंत्रीपदाची चिंता एकनाथ शिंदे यांनी करावी : जयंत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : मी पुन्हा येईन, असे म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर बसणार असतील, तर त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या चाळीसविरांनी करायला हवी, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे लगावला. शरद पवार यांचा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा कायम राहावा, यासाठी अनेकजणांनी देव पाण्यात घातले होते, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, सरकार कोसळणार का? याची चिंता आम्हाला नाही. देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेले आहेत. पण दोन नंबरच्या खुर्चीत बसले आहेत. ते पुन्हा येणार म्हणतायेत. मुख्यमंत्री शिंदे यांना बाजूला करून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसणार असतील, तर याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस विरांनी करायला हवी.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कायम राहावा, असे अनेकांना वाटत होते. पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने आम्ही आनंदित आहोत. आमचे ५३ आमदार आहेत. आम्हाला आत्मविश्वास आहे की, येत्या निवडणुकीत ही संख्या दुप्पट होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button