प्रत्येक गावांत पिण्याचे शुद्ध पाणी देणार : बाबर | पुढारी

प्रत्येक गावांत पिण्याचे शुद्ध पाणी देणार : बाबर

विटा पुढारी वृत्तसेवा : खानापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्यादृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. पारे येथील जलजीवन नळपाणी मिशन अंतर्गत मंजूर पुरवठा आणि इंदिरानगर येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ बाबर यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी दिलिप साळुंखे, धनाजी शेळके, धनाजी पाटील उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच पवन साळुंखे, पोपट सूर्यवंशी, भैरूनाना साळुंखे, गुलाब लोखंडे, नितीन पांढरे, पोपट साठे, विनोद वलेकर, सुरेश गायकवाड, सरस्वती शेंडगे, बेबी साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button