तब्बल 33 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. संथ गतीने कामे सुरू असल्याने परिसरात झाडी-झुडपे उगवली आहेत. पूर्ण झालेले काम धूळ खात आहे. तर, काही ठिकाणी नासधूस झाली आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्राणिसंग्रहालयास टाळे असल्याने सर्प, प्राणी, पक्षी दर्शन बंद असल्याने पर्यटनास खो बसला आहे. कमी व दाटीवाटीच्या ठिकाणी प्राणी व पक्षी असल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. त्यातील काही मोर, प्राणी व सर्प मेले आहेत. सर्प, पक्षी व प्राणी सांभाळण्यासाठी कर्मचार्यांवर पालिकेकडून लाखोंचा खर्च होत आहे. तसेच, पर्यटन बंद असल्याने तिकीटातून मिळणारे उत्पन्नही बंद आहे. कोट्यवधीचा खर्च करूनही प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले केले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.