पुणे : हुतात्मा राजगुरू वाड्याचे प्रवेशद्वार कोसळले | पुढारी

पुणे : हुतात्मा राजगुरू वाड्याचे प्रवेशद्वार कोसळले

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरू वाड्याचे प्रवेशद्वार सोमवारी (दि. २७) पहाटे ढासळले. प्रवेशद्वाराचे दगड, विटांचे बांधकाम असलेला भाग कधीही पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे हुतात्मा राजगुरू भक्तांना वाड्यात ये – जा करणे तसेच दैनंदिन वावर, अभिवादन करणे धोकादायक बनले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माेठा निर्णय : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेला वाडा भीमानदी तीरावर आहे. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक नियोजित आहे. काही कामे पूर्ण झाली आहेत, काही सुरू आहेत. मात्र, वाड्यात प्रवेश करायला असलेले प्रवेशद्वार एका बाजूने पडल्याने येथील वावर धोकादायक ठरणार आहे.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या जन्मस्थळाची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र, राजगुरूगर नगरपरिषद, पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष झाल्याने राजगुरु जन्मस्थळाची दुर्दशा झाल्याचे आरोप हुतात्मा प्रेमी करू लागले आहेत. हुतात्म्यांची उपेक्षा व अवहेलना होत असल्याची दुर्दैवी बाब यानिमित्ताने समोर आली आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या राजगुरु यांच्या जन्म स्थळाला अनेक देशप्रेमी नागरिक दररोज भेट देत असतात. परंतु, प्रवेशद्वार कोसळल्याने देशभक्त नागरिकांना आतमध्ये जाऊ दिले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिंदे गटाला मोठा दिलासा : सुप्रीम कोर्टाकडून नरहरी झिरवळ, अजय चौधरी यांना नोटीस, पुढील सुनावणी ११ जुलैला

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. दगड मातीच्या बांधकामात पाणी मुरले तर प्रवेशद्वाराची उर्वरित भिंत जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि हुतात्मा राजगुरू समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सचिव सुशील मांजरे, क्रांतिवीर राजगुरु ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.

Back to top button