माझा मृतदेह खड्ड्यात फेका...! कारण, दुःखी होण्यासाठी कोणीच नाहीये; नोकरीच्या शोधात आलेल्या इसमाची चिट्ठी लिहून आत्महत्या
पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही, असा मजकूर लिहून एकाने केजुदेवी बंधाऱ्यात आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १० जून रोजी सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला.
सुरेश कुमार (रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबरोबर काढला. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ”मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही.
पिंपरी: चिखलीतील रस्तेदुरुस्तीला सुरुवात
त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही”, असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी चिट्ठी जप्त केली आहे. मात्र, ही चिट्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का? तसेच, यामागे काही घातपात आहे का? याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.