नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू | पुढारी

नाशिक : वळूच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वलखेड येथे वळूने मारल्यामुळे शिवाजी जगन्नाथ बोंबले (६०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करीत असलेले सागर बोंबले यांचे वडील शिवाजी बोंबले यांचा गाई व म्हशींचा तबेला असल्याने ते दुधाचा व्यवसाय करतात. रविवारी, दि.27 सकाळी ते बैल (वळू) व गाई यांना घेऊन चारण्यासाठी जवळच असलेल्या कंपनीच्या पडीत गवताच्या भागात गेले असताना त्यांना वळूने गंभीर जखमी केले. यावेळी जवळपास कोणीच उपलब्ध नसल्याने त्यांच्या डोक्याला लागलेल्या गंभीर जखमेमुळे ते अस्वस्थ झाले. मार जबरदस्त लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घरातील कर्तापुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असून गावत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी बोंबले यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगा, दाेन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा:

Back to top button