मतदान प्रक्रिया मी योग्यरित्या पार पाडली : जितेंद्र आव्हाड | पुढारी

मतदान प्रक्रिया मी योग्यरित्या पार पाडली : जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मतदान प्रक्रिया मी योग्यरित्या पार पाडली. मतदान करताना माझे मतदान बाद होईल अशी कोणतीही चूक मी केलेली नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. विरोधकांनी रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली आहे, अशी टीकाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यांनतर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. आम्ही कोठेही चुकलेलो नाही, हे सांगण्यासाठी मी माध्यमांसमोर आलो आहे. मी कोठेही चुकलो नसताना विरोधकांकडून मला घेरण्याचा प्रयत्न होत आहे, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button