वाशिम : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
वाशिम ; पुढारी वृत्तसेवा मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील शेतात जागलीवर गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तऱ्हाळा येथील गणेश प्रकाश बाईस्कार (वय 28) हा शेतकरी आपल्या शेतात हरभऱ्यावर जागल होते. सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्येच दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.
तऱ्हाळा शिवारातील सर्वे नंबर 198/2 मध्ये 3.72 आर जमीन आहे. प्रकाश विठ्ठलराव बाईस्कार यांच्या नावावर हे शेत आहे. त्यांना 5 मुले व एक मुलगी आहे. मृत गणेश बाईस्कार हा चार नंबरचा मुलगा असुन, तो अविवाहित होता.
हेही वाचा :