चंदगड : गुळंबच्या युवकाची ऊंबरवाडी येथे आत्महत्या
चंदगड ; पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यातील तिलारीनजीक असलेल्या गुळंब येथील विजय विष्णू गोंडे (वय २३) या युवकाने गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथे आत्महत्या केल्याची घटना आज (दि. २७) उघडकीस आली.
विजय गोंडे याला गुळंब यात्रेच्या दरम्यान (दि.२४) रोजी सट्टू तुकाराम दळवी, प्रकाश धाकलू गोंडे आणि चंद्रकांत रामू गवस या तिघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तू गावात कसे राहतोस ते बघतोच’ अशी धमकी दिली. त्यानंतर (दि.२५) रोजीच्या रात्री २ वाजता शर्टाच्या गळफासाने आत्महत्या केली.गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी- गडहिंग्लज मार्गावरील उंबरवाडी येथील शेतातील विहीरीलगत झाडाला शर्टाच्या साहाय्याने आत्महत्या केली. या घटनेची वर्दी पोलिस पाटील विनया विठ्ठल सावंत यांनी नेसरी पोलिसांत दिली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न https://t.co/21nsKPiuk8बिहारचे-मुख्यमंत्री-नीतीश-कुमार-यांच्यावर-हल्ला/ar #Pudharionine #Pudharinews #NitishKumar #Bihar
— Pudhari (@pudharionline) March 27, 2022
चंदगड पोलिसांत विजय याचे काका बाळू नागोजी गोंडे यांनी शारीरिक, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक गणेशकर करत आहेत. विजयच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा