औंरगाबाद : मनसेने तोडले महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार रविवारी पहाटे औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले.
औरंगाबाद शहरात काही भागात ५ दिवसांतून तर, काही भागात ८ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो आहे.
- दगडी चाळीच्या भिंतीवर अरुण गवळी चे ‘पदवी’ सर्टिफिकेट!
- महाविकास आघाडी सरकार : काँग्रेस बाहेर पडल्यास भाजपचा बाहेरून पाठिंबा?
शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती.
- अकोला : हेडफोनवरून वाद मामेभावाने केला आतेबहिणीचा खून
- प्रियांका चोप्रा चे ‘या’ अभिनेत्यांच्या बायकांशी होते जोरदार भांडण
ही मागणी १० दिवसांत मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता.
त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगलाचे आज पहाटे नळ कनेक्शन तोडले.
पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या तरुणाचे मधुमाशी पालन व्यवसाय यशस्वी