काळजी घ्या! राज्यात 16 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’ | पुढारी

काळजी घ्या! राज्यात 16 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’

पुणे : गेल्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे. राज्यातील सर्वच भागांत 16 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वार्‍याची द्रोणीय रेषा मध्य प्रदेशातून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत आहे. हवेच्या दीड किलोमीटर उंचीवरच्या थरात थंड व उष्ण वार्‍याची टक्कर होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत गेल्या चोवीस तासांत पाऊस झाला; तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

रविवारचे तापमान : अकोला 42.5, पुणे 37.8, मुंबई 33.8, कोल्हापूर 37.7, अहमदनगर 38.8, जळगाव 41.7, महाबळेश्वर 31, मालेगाव 41.2, नाशिक 39.3, सांगली 39.6, सातारा 38.2, सोलापूर 42.3, धाराशिव 39.6, छत्रपती संभाजीनगर 39.6, परभणी 41.1, नांदेड 40.4, अकोला 42.5, अमरावती 41, बुलडाणा 39.5, ब्रह्मपुरी 40.9,.
असे आहेत ‘यलो अलर्ट’

  • कोकण  :  13 ते 15 मे
  • मध्य महाराष्ट्र :  13 ते 15 मे
  • मराठवाडा :  13 ते 15 मे
  • विदर्भ : 13 ते 16 मे

हेही वाचा

Back to top button