महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी महाविजय-२०२४ अभियानांतर्गत गेल्या दोन महिन्यांत २१ लोकसभा क्षेत्रात दौरा केला. यावेळी ३३ हजार ७१० पैकी ३३ हजार ६९७ नागरिकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिल्याने ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हे ध्येय साध्य होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
बावनकुळे यांचा सद्या ‘मिशन ४५+’ साठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. इतर पक्षांच्या नेत्यांना केवळ १३ जणांनी पसंती दिली. त्यापैकी ४ राहूल गांधी समर्थक होते यावर त्यांनी भर दिला. बावनकुळे म्हणाले, “गेल्या साडेनऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासामुळे, संपूर्ण जगात भारताचा गौरव केला, स्वावलंबी भारताची शपथ घेऊन, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्यावर भर दिला.”