काशीचा कायापालट | पुढारी

काशीचा कायापालट

‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ ( kashi ) असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमध्ये दिला जात असे. आपल्या या तीन शक्‍तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी येथील मोहिमा भाजपने पूर्ण केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीमध्ये जे काही काम केले आहे, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करीत असल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘काशी-विश्‍वनाथ कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट’ ( kashi ) मानला जातो. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या अजेंड्याला धार देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. या कॉरिडॉरचा लोकार्पण समारंभ जागतिक पटलावर आणून उत्तर प्रदेश सरकार हिंदूंना एक संदेश देऊ इच्छित आहे. हा हिंदुत्वाचा संदेश देण्यासाठीच लोकार्पण सोहळ्यानंतर सुमारे महिनाभर वेगवेगळे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. 8 मार्च, 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्‍वनाथ प्रकल्पाच्या शिलान्यास सोहळ्यात आपण बाबा विश्‍वनाथ यांना चिंचोळ्या गल्ल्यांपासून मुक्‍त करीत आहोत, असा संदेश संपूर्ण देशाला दिला होता. सुमारे 800 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता साकार झाला असून, आपण आपला वायदा पूर्ण केला असल्याचा संदेश केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकार देऊ इच्छित आहे. 13 डिसेंबरला झालेल्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यापुरती ही बाब मर्यादित राहिली नाही. त्यापाठोपाठ महिनाभर महाभियान सुरू राहणार आहे. देशभरातील हिंदूंना या कालावधीत काशीमध्ये आमंत्रित करून भाजप त्यांना आपल्या या मोहिमेशी जोडून घेत आहे.

‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ ( kashi ) असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमध्ये दिला जात असे. आपल्या या तीन शक्‍तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी येथील मोहिमा भाजपने पूर्ण केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीमध्ये जे काही काम केले आहे, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करीत असल्याचे दिसते. काशी विश्‍वनाथ धाममध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून काशीच्या माहात्म्याबरोबरच हिंदुत्वाचा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जगभरातील हिंदूंसाठी काशी हे पवित्र क्षेत्र मानले जाते. महादेवाच्या या दरबारात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा संदेश द्यायचा आहे. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणानंतर महिनाभर चालणार्‍या कार्यक्रमात भाजपचे सर्व पदाधिकारी, मंत्री आणि प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पुढील महिनाभर भाजपचे कार्यकर्ते गावोगावी जातील. प्रत्येक गावात छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून आयोध्येनंतर आता काशीचा कायापालट हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनविण्याचा प्रयत्न केला जाईल.

संबंधित बातम्या

2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी जेव्हा वाराणसीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा ‘माँ गंगा ने मुझे बुलाया है,’ असे म्हणाले होते. मोदी वाराणसीतूनच लोकसभा निवडणूक का लढवीत आहेत, याचे मोठे कुतूहल त्यावेळी लोकांना वाटले होते. कारण त्यांचे मूळ राज्य गुजरात असून, उत्तर प्रदेशाशी त्यांचा पूर्वी फारसा संबंध आलेला नव्हता. परंतु धार्मिक आणि ऐतिहासिक नगरी असल्यामुळे वाराणसी हे भाजपच्या पारंपरिक मतप्रणालीशी सुसंगत वातावरणनिर्मिती करणारे शहर आहे. त्याचप्रमाणे पूर्वांचल हेही एक खास कारण होते. शिवाय हा मतदारसंघ भाजपसाठी नेहमीच बालेकिल्ला मानला गेला आहे. भाजपची व्यूहरचना खूपच लाभदायक ठरली आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी अन्य कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला नाही. ( kashi )

हिंदुत्व आणि पूर्वांचलचा विकास या दोन्ही गोष्टी भाजपला भविष्यात लाभदायक ठरणार आहेत, याची पक्षाला खात्री आहे. 2014 मध्ये वाराणसीमधून निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या मतदारसंघात मोठमोठी विकासकामे केली. परंतु काशी-विश्‍वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधानांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला गेला. वाराणसीला ज्या-ज्यावेळी पंतप्रधानांनी दौरा केला, त्या-त्यावेळी ते बाबा विश्‍वनाथाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्याचबरोबर या प्रकल्पाच्या कामातील प्रगतीची पाहणीही केली. 2019 मध्ये या कॉरिडॉरची कल्पना मोदींनी बोलून दाखविली होती. या योजनेचा उद्देश मंदिराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 50,000 चौरस मीटरपर्यंत वाढविणे हा आहे. या कॉरिडॉरसाठी 800 कोटी रुपये खर्च आला आहे. या कॉरिडॉरसाठी मंदिराच्या आसपासच्या सुमारे 40,000 चौरस मीटर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वस्तुतः मंदिराच्या आसपास राहणार्‍या दाट लोकसंख्येला विस्थापित करावे लागणे, ही मुख्य समस्या होती. परंतु कौशल्याने हे काम करण्यात आले आणि सुमारे 260 घरमालकांना तसेच या इमारतींमध्ये राहणार्‍या भाडेकरूंना कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी जमीन अधिग्रहण करण्यातच दोन वर्षे निघून गेली. अधिग्रहणानंतर जुन्या मंदिरांना संरक्षण देणे हा महत्त्वाचा मुद्दा होता. अधिग्रहण केल्यानंतर घरे पाडली जाऊ लागली, तेव्हा त्यात अनेक जुन्या मंदिरांचा शोध लागला. ( kashi )

सुमारे 125 छोट्या-मोठ्या मंदिरांची प्रतिष्ठापना या कॉरिडॉरमध्ये एका साखळीच्या स्वरूपात करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराचे क्षेत्रफळ सुमारे 55 हजार चौरस मीटर आहे. सर्वात महत्त्वाची एक बाब अशी की, ज्ञानव्यापी मशिदीचे संचालन करणार्‍या समितीने मशिदीच्या परिसराबाहेर जमिनीचा एक तुकडा विश्‍वनाथ मंदिर ट्रस्टला दिला आहे. ही जमीन अन्य एका जमिनीच्या मोबदल्यात दिली गेली आहे. काशी विश्‍वनाथाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, हजारो वर्षांपासून वाराणसीत हे मंदिर आहे. एकदा या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि गंगेत स्नान केले की मोक्ष मिळतो, असे मानले जाते. प्रलयकाळातही या मंदिराचा लोप होत नाही, असेही मानले जाते. अशा वेळी भगवान शंकर हे मंदिर आपल्या त्रिशुळावर धारण करतात. सृष्टीकाल आल्यावर ते खाली उतरवून ठेवतात. याच स्थानावर भगवान विष्णूने सृष्टी उत्पन्‍न करण्यासाठी तपश्‍चर्या करून आशुतोषाला प्रसन्‍न करून घेतले होते. त्यानंतर ते जेव्हा झोपले, तेव्हा त्यांच्या नाभीकमळातून ब्रह्मा उत्पन्‍न झाले. त्यांनी सर्व सृष्टीची रचना केली अशी श्रद्धा आहे.

स्कंदपुराणात या नगरीच्या इतिहासाचे वर्णन केले आहे. रामायण आणि महाभारतातही या नगरीचे वर्णन आहे. सध्याच्या मंदिराचे बांधकाम महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 मध्ये केले होते. त्यानंतर महाराजा रणजितसिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलो शुद्ध सोन्याने हे मंदिर बनविले. नेपाळच्या महाराजांनी येथे नंदीची विशाल मूर्ती स्थापित केली होती. या शहरावर सर्वप्रथम मोहंमद घोरीने सन 1163 मध्ये आक्रमण केले होते. नंतर सातत्याने 600 वर्षे परदेशी आक्रमणे या शहराने सहन केली. 1663 मध्ये औरंगजेबाने मंदिर नष्ट करून त्याजागी भव्य मशीद उभारली. 1852 मध्ये बाजीराव पेशवे यांनी येथील प्रसिद्ध काळभैरव मंदिर बांधले.

पंतप्रधान मोदी यांनी सात नोव्हेंबर 2014 रोजी आपल्या पहिल्या दौर्‍यावेळी बडा लालपूर येथे ट्रेड फॅसिलिटी सेंटर आणि टेक्स्टाइल सेंटर तयार करण्याची घोषणा केली होती आणि वाराणसीच्या विकासाला गती देण्यास प्रारंभ केला होता. त्यानंतर वाराणसीच्या प्रत्येक दौर्‍यावेळी हजारो कोटी रुपयांच्या योजनांसह ते आपल्या मतदारसंघातील जनतेला भेटत राहिले. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नोव्हेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून दोन हजार कोटींच्या असंख्य योजनांना प्रारंभ करून काशीची विकासयात्रा गतिमान केली. कोरोनासारख्या अडथळ्यांमुळेही काशीचा विकास थांबू शकत नाही, असा संदेश तेव्हा दिला गेला होता. पंतप्रधान मोदी नोव्हेंबर 2020 मध्ये देव दिवाळीच्या दिवशी बनारसला गेले होते आणि बनारसचे नवे स्वरूप संपूर्ण जगासमोर मांडले. सात वर्षांत बाबतपूर-वाराणसी रस्ता, रिंग रोड-1, लहरतारा-चौकाघाट फ्लायओव्हर, बीएचयूची सुपर स्पेशालिटी, एमसीएच विंग, कॅन्सर हॉस्पिटल, पॅरिसेबल कार्गो, जलपरिवहन यांसह अनेक योजनांवर त्यांनी काम केले आहे. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरमुळे गंगास्नान केल्यानंतर भाविक गंगाजल घेऊन थेट विश्‍वनाथ मंदिरात पोहोचू शकतील. ज्योतिर्लिंगावर गंगाजलाचा अभिषेक करतील आणि 27 देवळांच्या मणिमालेचे दर्शन घेतील. ही मंदिरे खूपच खास आहेत. यातील अनेक घरे अधिग्रहण केलेल्या घरे पाडल्यानंतर सापडली आहेत. अशा मंदिरांची संख्या सुमारे 25 आहे. अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्‍वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर सुमारे 352 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला आहे आणि हे मंदिर आता भारताची ओळख बनणार आहे.

– योगेश मिश्र
राजकीय विश्‍लेषक

Back to top button