जनतेचा विश्‍वास केवळ सुशासन आणि विकासाच्‍या राजकारणावर : PM नरेंद्र मोदी | पुढारी

जनतेचा विश्‍वास केवळ सुशासन आणि विकासाच्‍या राजकारणावर : PM नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाला स्‍पष्‍ट होत आहेत. मतमोजणीनुसार तिन्‍ही राज्‍यात भाजपने जोरदार मुसंडी मारल्‍याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशाबाबत Xवर पोस्ट केली आहे. त्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ‘जनतेला नमन! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे दाखवून देत आहेत की, भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. या सर्व राज्यातील कुटुंबीयांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.

‘यानिमित्ताने, पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांसमोर मांडली त्‍याला तोड नाही. विकसित भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आपल्याला भारताला विजयी करायचा आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे.

Back to top button