'सुख म्हणजे नक्की काय असतं': गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत पुढे काय घडणार? याची उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे. शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या
- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सेटवर बिबट्याचे दर्शन
- सुख म्हणजे नक्की काय असतं फेम शालिनीचे शिक्षण झाले तरी किती?
- ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये योगेश सोहोनीची होणार एन्ट्री!
मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. ज्या जोडीला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं ती जयदीप-गौरीची लोकप्रिय जोडी अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या वळणासह मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल.
पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येणार आहेत. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.