जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकीप्रकरणी कारवाई करावी : अंबादास दानवे | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकीप्रकरणी कारवाई करावी : अंबादास दानवे

मुंबई,पुढारी वृत्‍तसेवा : जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची तात्‍काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी. तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

दरम्‍यान, सरकारकडून यावर उत्तर देण्यात आले की, ही अतिशय गंभीर बाब असून निषेधार्ह आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडी अधिकारी देऊन त्याची चौकशी केली जाईल. तसेच एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले.

.हेही वाचा 

ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या चौकशीला सुरुवात

मोठी बातमी : सिसोदिया यांना दिलासा नाहीच; ईडी कोठडीत आणखी ५ दिवसांची वाढ

सत्ताधारी-विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज ठप्प

 

Back to top button