Virat Kohli : अनुष्काच्या पोस्टवर विराटची रोमँटिक कमेंट, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम…’ | पुढारी

Virat Kohli : अनुष्काच्या पोस्टवर विराटची रोमँटिक कमेंट, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : “प्रत्येकवेळी माझ्यासोबत राहिल्याबदद्ल माझ्या प्रेमाचे आभार. मी तुझा आभारी आहे. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असा रिप्लाय विराट कोहलीने (Virat Kohli) त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) इन्स्टाग्राम (Anushka Sharma insta post) पोस्टला दिला आहे. टी२० वर्ल्ड कपच्या मेलबर्नमधील अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) हरवले. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली (Virat Kohli). त्याच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक अशा अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताला हा विजय संपादन करता आला. या विजयानंतर अनुष्का शर्माने इन्स्टावर सामन्याचे फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली होती.  

Anushka Sharma insta post : काय आहे अनुष्काची पोस्ट

अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ती या पोस्टमध्ये म्हणते आहे, ‘लोकांच्या आयुष्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुझ्या खेळीने एक नवा प्रकाश आणि नव चैतन्य आणले आहे. तुझी एकाग्रता आणि जिद्द आणि स्वत:च्या कामगिरीवरचा विश्वास भन्नाट आहे. मी आज माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला आहे. आपली आई अशी का डान्स करत आहे, ओरडत आहे आणि जल्लोष करत आहे, हे कळण्याच्या वयात आपली मुलगी नाही. पण, ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला कळेल, की तिच्या बाबाने त्या दिवशी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती. तिही त्याच्यासाठी खडतर ठरलेल्या काळानंतर. कठीण परिस्थितीला जिगरबाज वृत्तीने तोंड देत त्याने ही कामगिरी करुन दाखवली. मला तुझा अभिमान वाटतो विराट. तुझ्यावर प्रेम करतच राहीन. आनंदातही आणि संघर्षाच्या काळातही. (India Beat Pakistan In T20 World Cup 2022). अनुष्काच्या या पोस्टवर कॅटरीना कैफ, कार्तिक आर्यन, पुजा हेगडे, विद्या बालन आदी कलाकारांनी कॉमेंट केल्या आहेत. 

Virat Kohli : ‘तो’ एक चेंडू अन् विराटने पाकिस्तानला केले उद्ध्वस्त!

भारत- पाकिस्तान सामना

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताकडून जी कामगिरी विराट कोहलीने (Virat Kohli) बजावली आहे, त्याचा अनुष्कालाच काय तर अवघ्या प्रत्येक भारतीयाला विराटचा अभिमान वाटेल. त्याच्या झुंजार खेळीने अशक्यप्राय विजय मिळवून दिला. तो 53 चेंडूत ८३ धावा करत अखेरपर्यंत नाबाद राहिला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. ३१ धावांवर ४ बाद अशी बिकट अवस्था भारताची झालेली असताना हार्दीक पंड्याच्या सहाय्याने भारताला विजय मिळवून देण्याची किमया विराटने साधली. विराटच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक अशी आजची विशेष खेळी होती. सर्व भारतीय विराटच्या या कामगिरीचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. यामध्ये त्याची पत्नी अनुष्का देखील सहभागी झाली अन् आजचा हिरो ठरलेल्या आपल्या नवऱ्याचे तिने तोंडभरुन कौतुक केले.

हेही वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button