शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये चाललेल्या पार्टीबाबत रितेश देशमुखने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा | पुढारी

शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये चाललेल्या पार्टीबाबत रितेश देशमुखने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख अनेकदा त्याच्या लाईफ स्टाईलने ही लाईमलाइटमध्ये असतो. त्यापेक्षाही जास्त चर्चेत असतात त्या ‘मन्नत’ वरील पार्टी. शाहरुख आणि गौरी हे बॉलीवूडमधील पॉवर कपल त्यांच्या खास पार्टी देण्याच्या अंदाजासाठी ओळखले जातात. ‘मन्नत’ वरील पार्टीचं कौतुक सेलिब्रिटीही करताना दिसतात. अभिनेता रितेश देशमुखने शाहरुख-गौरीच्या या ड्रीमहाऊसवर होत असलेल्या पार्टीबाबत मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखती दरम्यान त्याने ‘मन्नत’ वरील पार्टीबाबत शेअर केलं आहे. रितेश म्हणतो, ‘मन्नत’ वर लेट नाईट पार्टी असते. पहाटे तीन वाजता जेवण सर्व्ह होण्यास सुरुवात होते. यावेळी लव्हिंग कपल शाहरुख आणि गौरी पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले असतात.’ पण या पार्टी दरम्यानच्या शाहरुखच्या एका वेगळ्या सवयीबाबत रितेशने खुलासा केला आहे. रितेश म्हणतो तुम्ही जेव्हा पार्टीमधून शाहरुखचा निरोप घेता त्यावेळी तो तुम्हाला तुमच्या गाडीपर्यंत सोडायला येतोच. याशिवाय गाडीचं दारही स्वत: उघडतो. इतक उत्तमप्रकारे निरोप देणाऱ्या होस्टचं रितेशने कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या या सवयीबाबत गौरीनेही खुलासा केला आहे. कॉफी विथ करणमध्ये आलेल्या गौरीने शाहरुखच्या अशा निरोप देण्याच्या पद्धतीचा कायम राग येत असल्याचं सांगितलं आहे.

Back to top button