नाशिक : पेठ महामार्गावर मोहाचापाडानजीक मालट्रक -दुचाकीच्या अपघातात तीन तरुण ठार
पेठ ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर मोहाचापाडा नजिक ट्रक व दुचाकीत अपघात होवून दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले.
याबाबतची माहिती अशी की, गुजरात राज्याकडून येणारी मालवाहु ट्रक (क्रमांक एमएच १२ क्युड्ब्लु ६७८९) व पेठकडून नालशेतकडे जाणारी दुचाकी (क्रमांक एमएच १५ एच एन ७०२५) याच्यांत महामार्गावर मोहाचापाडा फाट्यानजीक समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील रमेश गणपत कडाळी ( वय २४, राहणार नालशेत, ता.पेठ) , अविनाश अबु कुवर ( वय२२, राहणार चावसाळा, गुजरात राज्य) आणि निर्मला सोमनाथ गडदे (वय १८, राहणार हट्टीपाडा ता.पेठ) हे जागीच ठार झाले. पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पेठ पोलीस करीत आहेत.
हेही वाचलंत का?
- मंचर : मोटारसायकलची चोरी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद
- पाटस : ज्येष्ठ नागरिकाला 60 हजारांना लुटले
- धुळे : बोराडी गावातून १ लाख ७० हजारांचा मद्याचा साठा जप्त