कोरोना चाैथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, "राज्यातील नागरिकांनी..."
पुढारी ऑनलाईन : सध्या राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी, राज्यातील रूग्णवाढीचा दर कमी आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. राज्याला चौथ्या लाटेचा धाेका कमी आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमाशी बाेलताना स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट जूनमध्ये धडकणार असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची चाैथी लाट येणार का, अशी चर्चा हाेत आहे.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी, राज्यातील रूग्णवाढीचा दर कमी आहे, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. राज्याला चाैथ्या लाटेचा धाेका कमी आहे.
हेही वाचा :
- Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस
- थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका
- मोहाली आरपीजी हल्ल्याची SFJ संघटनेने घेतली जबाबदारी; २० संशयितांना अटक
Big Breaking : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित. https://t.co/nrxsoj4KCW
— Pudhari (@pudharionline) May 11, 2022