रतन टाटा यांचा एअर इंडियाच्‍या प्रवाशांना खास संदेश, म्‍हणाले… | पुढारी

रतन टाटा यांचा एअर इंडियाच्‍या प्रवाशांना खास संदेश, म्‍हणाले...

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
नुकतीच सरकारी विमान कंपनी एअर इंडिया ( Air India ) ही टाटा समुहाकडे सोपवली गेली. केंद्र सरकारने टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतली होती. आता एअर इंडियाच्‍या ‘महाराजा’ पुन्‍हा एकदा टाटा समुहाकडेच सोपवण्‍याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. यावर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी एअर इंडियाच्‍या प्रवाशांना खास संदेश दिला आहे. रतन टाटा यांनी एअर इंडियाच्‍या ट्‍विटर अकाउंटवरुन हा संदेश दिला आहे.

एअर इंडियाच्‍या ट्‍विटर अकाउंट वरुन दिलेल्‍या संदेशात रतन टाटा यांनी म्‍हटलं आहे की, एअर इंडियाच्‍या प्रवाशांचे मन:पूर्वक स्‍वागत आहे. प्रवाशांना सुखकारक प्रवासाची सेवा देण्‍यासाठी आम्‍ही एकत्रीत प्रयत्‍न करणार आहोत.

८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्‍या लिलावावेळी एअर इंडिया ( Air India ) ही १८ हजार करोड रुपयांमध्ये  टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली होती.  टॅलेस ही कंपनी टाटा समुहाचीच उपकंपनी आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हस्‍तांतरीत करण्‍यात आल्‍याचे सरकारने स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचलं का? 

Back to top button