दिल्लीमध्ये पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू | पुढारी

दिल्लीमध्ये पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीच्या मुकुंदपूर भागात पावसामुळे साठलेल्या पाण्यात बुडून शुक्रवारी (दि.१४) तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसामुळे मुकुंदपूरमधील एका मैदानात पाणी साचले होते. त्यात आंघोळ करण्यासाठी काही मुले गेली होती. यात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला.
मुले बुडताना एका पोलिस कर्मचाऱ्याने धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.  तिन्ही मुले जहांगीर पुरीच्या एच-ब्लॉक मध्ये राहणारी होती. दिल्लीत अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले असून लोकांनी पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असा इशारा दिल्ली सरकारने दिला आहे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी दिल्लीत एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा 
 

Back to top button