Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश भागात मुसळधार; 'या' जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे. 25 सप्टेंबरपर्यंत बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. शुक्रवारी (दि. 21) कोकण, घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
- Nashik : इगतपुरी पट्टयात मुसळधार पावसाचा तडाखा
- Pune Rain News : पुण्यात मुसळधार पाऊस; 5 दिवस हलक्या सरींचा अंदाज
- मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून
या जिल्ह्यांत यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
हेही वाचा
पुष्पा इम्पॉसिबल : देवी सिंह शेखावतच्या रूपात उर्वशी धोलकियाची एन्ट्री
Nagar news : ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
मुस्लिम खासदाराबाबत असभ्य उद्गार काढणाऱ्या भाजप खासदाराला नोटीस