पुणे : रात्रीच्या अंधारात बेळगावला का गेले नाहीत : रोहित पवार | पुढारी

पुणे : रात्रीच्या अंधारात बेळगावला का गेले नाहीत : रोहित पवार

पुणे : रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येते, मग बेळगावला का नाही, असा सवाल करणारे टि्वट आमदार रोहित पवार यांनी करीत शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादी कँाग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वटरवर आपल्या भावना व्यक्त करताना सूरतवारी ते सरकार पाडण्यापर्यंतचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवरून टोलेबाजी केली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करीत अडवणूक केली जात आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील आक्रमक होत आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये न येऊ देण्याचा फतवा काढत आहे. त्यामुळे एकीकडे कर्नाटक सरकार आक्रमक होत असताना महाराष्ट्राची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Back to top button