नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू | पुढारी

नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून गंभीररीत्या भाजलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडली. राणी दशरथ चव्हाण असे या महिलेचे नाव आहे.

राणी ३ जुलैला सायंकाळी राहत्या घराच्या छतावर वाळत घालेले कपडे काढत असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यात त्या ४० टक्के गंभीररीत्या भाजली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मंगळवारी (दि.११) मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Back to top button