कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, राजाराम बंधारा पाण्याखाली
कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा पावसाने एक महिना उसंत घेतल्याने शेतकऱ्यांसमोर पीके कशी जगवायची असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच गेले तीन-चार दिवस पावसाच्या सरी कोसळू लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या पावसाने आज (रविवार) सकाळी पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागले. सकाळी पाणी पातळी १७ फुटांवर होती. खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली.
हेही वाचा :
- Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक पत्नीसह अक्षरधाम मंदिरात; परंपरेप्रमाणे अनवाणी पायाने प्रवेश; भगवान स्वामी नारायणांची केली आरती (फोटो व्हायरल)
- अयोध्येत २२ जानेवारी रोजी गर्भगृहात रामलल्लाची प्रतिष्ठापना
- Aditya-L1 Mission: ‘आदित्य L-1’ ने तिसर्यांदा यशस्वीरित्या बदलली कक्षा; लक्ष्यापासून काहीच पावले दूर