टनामागे 200 किलोंची चोरी करणार्यांनी ‘राजाराम’च्या काट्याविषयी बोलू नये : शिवाजी पाटील
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : टनामागे 200 किलोंची चोरी करणार्यांनी राजाराम साखर कारखान्यावर बोलू नये, असा इशारा राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिला.
तुमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घालणारेच निवडणुकीच्या तोंडावर आता तुमचे पाय धरायला येत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन करत आ. अमल महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सत्तारूढ आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील गावांतील सभासद शेतकर्यांची भेट घेतली.
यावेळी पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील साखर कारखान्यात टनामागे 200 किलो उसाची राजरोसपणे चोरी होत असल्याचे ट्रॅक्टर चालक खासगीत बोलत असतात, पण या गावगुंडांना विचारणार कोण? म्हणून ऊस पुरवठा करणारे शेतकरी गप्प बसतात. गगनबावड्यात जे घडतय ते कसबा बावड्यात होऊ देणार नाही. जमिनी लाटणार्यांनी आणि डोनेशनवर गब्बर बनलेल्यांनी महाडिकांवर बोलू नये, असा इशाराही पाटील यांनी दिला.